ऐन वैशाखातच मान्सूनच थैमान! कृषी यंत्रणांसमोर मोठं आव्हान

Big-news-Monsoon-arrives-in-Vaishakha-Agriculture-will-be-hit-hard-Kharif-season-will-be-extended-production-will-decrease

पुणे: (२५ मे) दरवर्षी मे महिन्यात वैशाख मास येतो आणि तेव्हा उन्हाचा प्रखर चटका टिपेला म्हणजे 44 अंशांवर जातो. त्यामुळे सर्वंत्र वैशाख वणवा पेटला असे म्हटले जाते. मात्र या वर्षी चैत्र महिना सुरू असतानाही  पारा 44 अंशांवर गेल्याने चैत्रातच वैशाख वणवा पेटल्याची स्थिती तयार झाली होती. राज्यात चैत्र महिन्यातच यंदा वैशाख वणवा पेटलेला दिसून आला, बहुतांश शहरांचा पारा 43 अंशांवर गेला होता. या वेळी मात्र महाराष्ट्रात ठिकठिकाणी ऐन वैशाखातच मान्सूनच थैमान घातल्याचे दिसत आहे. तथापि, 18 मेपासून सलग आठ दिवस महाराष्ट्रात वळवाने दैना उडवून दिली आहे. राज्याच्या सर्वच भागात पावसाने तांडव घातले.  मराठवाड्यात काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला, तर मुंबईत 1951 नंतर 75 वर्षांत प्रथमच ऐन वैशाखात 22 अंशावर तापमान उतरले. मात्र आता बातमी समोर आली आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केले आहे की, दक्षिण-पश्चिम मान्सून यंदा महाराष्ट्रात वेळेपूर्वी दाखल झाला असून कोकण, गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रातील भागांमध्ये पहिल्या जोरदार सरींची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.  यंदा मान्सूनचं लवकर आगमन ही आनंदाची बातमी ठरू शकली असती, परंतु त्याचं वैशाखातलं आगमन हे शेतीच्या दृष्टीनं धोक्याचं व आर्थिक फटक्याचं कारण ठरू शकतं. खरीप हंगामातील ही अनिश्चितता पाहता सरकार आणि कृषी यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.



मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन:

महाराष्ट्रात साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होतो, परंतु यंदा तो सप्टेंबरपूर्वीच्या घसरलेल्या तापमानामुळे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे लवकर सक्रिय झाला. सध्या मान्सून कोकण, गोवा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि साताऱ्याच्या काही भागांपर्यंत पोहोचला आहे.


यंदा पावसाचं स्वरूप कसं असेल?

हवामान विभागाच्या हंगामी अंदाजानुसार, यंदा पावसाचे प्रमाण महाराष्ट्रात "सामान्य ते किंचित अधिक" राहणार आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यान पर्जन्यमान ९५% ते १०५% दरम्यान राहण्याची शक्यता आहे.


विभागनिहाय अंदाज:

कोकण व गोवा : अत्यधिक पावसाचा इशारा, विशेषतः जून-जुलै महिन्यात मुसळधार पावसाची शक्यता. दरड कोसळणे व पूरसदृश्य परिस्थिती उद्भवू शकते.

पश्चिम महाराष्ट्र (पुणे, कोल्हापूर, सातारा) : सुरुवातीला मध्यम स्वरूपाचा पाऊस, पण जुलै-ऑगस्टमध्ये नियमित व समाधानकारक पावसाची शक्यता.

मराठवाडा : जूनमध्ये पावसात खंड राहण्याची शक्यता, परंतु हंगाम अखेरीस एकूण पर्जन्यमान समाधानकारक राहण्याचा अंदाज.

विदर्भ : विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यांसह जोरदार सरींची शक्यता, विशेषतः जुलै-ऑगस्टमध्ये.


शेतीला जबर तडाखा - खरीप हंगाम लांबणार, उत्पादन घटणार?

आठ दिवसांपासून ठिकठिकाणी वळवाने झोडपून काढल्याने आता रोहिणीची धूळवाफ पेरणी अशक्यच झाली असून, खरीप हंगामासाठी शेती तयार करणेही लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. माळरान वगळता अन्य ठिकाणी अशी अडचणीची परिस्थिती आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना मुहूर्त कधी साधता येणार, हा प्रश्नच असून अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरण्या लांबण्याचीच शक्यता दिसत आहे. विद्यमान परिस्थिती लक्षात घेता, खरीप हंगाम लांबला, तर खरीप उत्पादनास किमान 15 ते 25 टक्के घट होण्याची शक्यता आहे. फळबागांवरील परिणामातूनही फळबागांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.